महाराष्ट्रात तिहेरी चक्रीय वाऱ्यांचा प्रभाव; उकाडा, अवकाळी पाऊस आणि दमट वातावरणाचा इशारा
राज्यात सध्या तीन चक्रीय वाऱ्यांच्या प्रभावामुळे हवामानात मोठे बदल होत असून उकाडा आणि अवकाळी पावसाचे दुहेरी संकट निर्माण झाले आहे. कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता तर मुंबईत तापमान 35 अंशांपर्यंत पोहोचल्याने नागरिक हैराण झाले आहेत.






